मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१४५]                                                                    श्री.                                                       ४ नोव्हेंबर १७१८.

स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४५ विलंबीनामसंवत्सरे मार्गशीर्ष शु॥ १० भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री नारो पंडित सचीव यांसी आज्ञा केली ऐसीजे :- मले रायरी येथील सरदेशमुखीच्या विभागानिमित्त र॥ पिलाजीराव बिन गणोजीराव व देवजीराव बिन पिलाजीराव, व गुणाजीराऊ बिन बहिरजीराव शिरके यांमध्यें, व र॥ कान्होजीराव व बहिरजीराव व कुवरजीराव बिन रामोजीराव व दवलतराव बिन कान्होजीराउ शिरके यांमध्यें लाथळा लागला होता. त्याचा निवाडा गोतमुखेंकरून निम्में वतन व वतनाचें वडीलपण कान्होजीराव शिरके यांस देऊन निम्में वतन पिलाजीराव शिरके यांस दिल्हें आहे, वतनपत्रें आलाहिदा सादर आहेत. निवाडियाप्रमाणें उभयतां वतनांचा उपभोग आपलाले विभागांत बापभाऊ देखील करितील. ऐशास मामलेजकुरंचे महाल जिल्हेंत आहेत.
१ हिरडसमावळ. १ कानपखोरें. १. मोसेखोरें १. मुठेखोरें.
१ निजामपुर. १ गोरेगाव.

एकूण सहा महाल आहेत. तेथील सरदेशमुखीचें वतन निम्में कान्होजीराव शिरके व निम्में पिलाजीराव शिरके यांस चालविणें. हक्क इनामत निम्मेप्रमाणें उभयतांस चालवीत जाणें; आणि वतनाची सेवा दंडकप्रमाणें याजपासून घेत जाणें. याउपरी उभयतांध्ये गर्गशा होऊं न देणें. निम्मेप्रमाणें सरदेशमुखींचे वतन उभयतांचे दुमाले करून वंशपरंपरेनें चालविणें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries