मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

पुढें प्रजापतीच्या पौषापासून ज्येष्ठ आषाढमास सलास खमसेन पावेतों मुलेंमाणसें यांणीं किल्यावर जाच सोशिले. माणसें सुटलियावर दादाप्रतिनिधी याणीं जगन्नाथपंतास सातारियास कैदेदाखल ठेविलें. त्यांचीं बायकोमुलें तेथें गेलीं. आमची मातोश्री कोंकणांत बीरबेटास गेली. ती॥ सातारियास जगन्नाथपंतसुध्दां राहिले. जगन्नाथपंतीं बदवकेली कांहीं करूं नये. याप्रमाणें दादाप्रतिनिधीजवळ ती॥ जामीन राहिले. दादा प्रतिनिधी, यमाजीपंत मुतालिक, कांहीं उपाय न चाले. तेव्हां पुणियांत सदाशिव चिमणाजी यांचे विद्यमानें सूत्र लावून तेथून कांहीं स्वार लोक आणून मुलेंमाणसेंसुध्दां पुण्यास गेलों. गोपाळराव यांचे तीर्थरूप व चुलते व बंधू आले असें समजोन, गोपाळराव यांचे सलाबतीवर नानासाहेब सामोरे येऊन बहुमानें करून सत्कारयुक्त पुणियांत नेऊन, जागा व खर्चास दरमहा नेमून देऊन ठेविलें. इकडे मोरोपंतभाऊ हत्तीघोडीसुध्दां होते तेहि पुणियास आले. सर्व एकत्र राहिले. पुढें सरंजाम नेमून द्यावा अशी बोली लागली. इतक्यात मोरोपंत भाऊ याचे आपण चालवितों असें यमाजीपंतीं करून, बोभाटा येऊं देत नाहीं ह्मणून रुद्राजीपंत अप्पा यांसी घेऊन गेले. ती॥ व जगन्नाथपंत पुण्यांत राहिले. दोन वर्षें प्रतिनिधि दादा यांणीं केली; नंतर वारले. त्याचे मागें त्याचे चिरंजीव यांणीं सहा महिने प्रतिनिधी केली. त्या कारभारांत आमचे वतनविषय कांहीं चाललें न चाललें. दादाचे पुत्रहि निवर्तलेयावर पूर्ववतप्रमाणें भवानराव यांसी प्रतिनिधी जाहाली. मुतालकी यमाजी शिवदेव, याप्रमाणें कांहीं दिवस चाललें. आमचा सरंजाम पूर्ववत् नेमून द्यावा ह्याप्रमाणें ठरावांत आलें. ती॥ यांस पुणें यांची हवा न माने ह्यास्तव निघोन मलकापुरास आले. तेथें विशाळगडीं रसद देवून मलकापूर सुभा केला. इकडे पुण्यांत ठराव झाला कीं, गोपाळराव याचे तीर्थरूप व चुलते व बंधू यांसी सरंजाम द्यावा. ह्याप्रमाणें नेमून दिल्हा ते समयीं जगन्नाथपंत यांसी ताकीद जाहाली कीं तुह्मीं गोपाळराव यांचे तीर्थरूप यांचे आज्ञेंत न चालले. जगन्नाथपंतीं माणसें मलकापुरीं आणिलीं. आपणहि आले. तेव्हां तीर्थरूपीं सांगितलें जे तुह्मी स्वतंत्र जाहला, आमचें सांगितलें तुह्मांस मानत नाहीं, पेशजी सांगितलें न ऐकून ढोंग कारभाराचें केलें, पदरचा पैसा खर्च करून सर्वस्व घालविलें, खराबींत आलां, याउपरी ज्यांणीं जें वतन, गांव, जमीन वगैरे मिळविलें असेल त्याचें त्याणें घेऊन विभक्त रहावें, आह्मांस न पुसतां आमचा पैका तुह्मीं जो खर्च केला आहे तो आमचा भरून द्यावा. याप्रमाणें बोली लाविली. गोपाळ विठ्ठल व शिवराव विठ्ठल यांसी आणून, त्यांजकरवी हिशेब करून समजून घेतला. जगन्नाथपंतीं पैका व जमीन व इतर वतन कांहींएक मिळविलें नाहीं, पैक्याची खराबी मात्र केली असें त्याचे माथा आलें. तेव्हां त्याणें आमचे मातुल हणमंतराव सरदेसाई यासी व नारोबा नाईक मुडले स्नेही यासी मध्यस्थींच घातलें कीं, आणावें तो न आणिलें, जगन्नाथपंतीं कांहीं न मेळवितां पैक्याची मात्र खराबी केली हें प्रमाण. परंतु, ज्या प्रभूजवळ गोपाळराव यांणीं पैका मेळविला त्याच प्रभूकार्यावर खर्च केला, यास तुह्मीं द्वैत धरूं नये, आणि अंतरही देऊं नये येविशीं मातोश्री आकाबाईचें सहगमनमयीचं वचन आहे. इ.इ.इ.*

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries