मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[४०७]                                                                       श्री.                                                                २६ आगष्ट १७५२.

पौ श्रावण वद्य १३ बुधवार शके १६७४.

वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल स्वकीय लिहित गेलें पाहिजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री सिधारीलाल याविशींचा मजकूर लिहिला तो कळला. त्यांनीं पत्र लिहिलें होतें; त्यावरूनही कळला. त्यांणीं अर्जीं लिहिलें आहे, तें आपले पत्रांत घालून जरूर गाजुदीखान यांस पावती होय तें करावें, ह्मणोन लिहिलें तें कळलें. सईद लष्करखान व जानोजी निंबाळकर आले आहेत, त्यांची हालचालीबद्दल वर्तमान आह्मांस लिहावें ह्मणजे संतोष होईल ह्मणोन तुह्मीं लिहिलें तें कळलें. गाजुदीखान अशीदीपलीकडे बोरगांवकर आले. आजला बऱ्हाणपुरास आले असतील ह्मणोन लिहिलें तें कळलें. आह्मीं पेडगांवांस काल आलों. जानबा, खान यांची भेट घेऊन, दोन रोज मजलीमुळें बोलणें झालें नाहीं. बोली झाल्यावर लिहून पाठवूं. हे येथे आले ह्मणोन सरदारांनीं केले कामास अंतर पडेल असा मजकूर नाहीं. सरदारही आजपर्यंत देखील फेरोजंग बऱ्हाणपुरास दाखल झाले असतील. आह्मांस येथें उतरावयास आठ दहा रोज लागतील. पांच सात हजार फौज जमा झाली. आठा रोजांत पंधरा हजार होईल. शहरकर गृहस्थांनीं जो आमचा विचार पहिला आहे, तोच निश्चय चित्तांत आणून फेरोजजंगास भेटावें याप्रो बोलणें. बहुत काय लिहिणें. सधारीलालाचे पत्राचें उत्तर पाठविलें आहे, हें देऊन बहुत समाधान करणें. आपली तयारी करावी. बुऱ्हाणपुराआलीकडे आलियास जाऊन मुलाजमत करावी. सरदारास व फेरोजंगास आपलीं पत्रें व त्याची अर्जी रवाना केली. हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries