मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आषाढ शु. १ मंगळवार शके १७१५.

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री
गोविंदराव स्वामीचे सेवेसीं.

पो गोविंदराव कृष्ण सां। नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असावें. विशेष मौजे बिरमपूर उर्फ बालेपांसरी वगैरे गांव पा नेवासे हें गांव नवाब बंदगानअली यांचे सरकारांतून महमद रुस्तम अलीखान यांचे जातीचे जागीरींत होऊन सनद खासमोहरी जाली. ऐसीयास राजश्री माहाराव निंबाळकर याणीं राजश्री मोरो हरि कमावीसदार पामारकर यांस सांगोन खान मजकूर यांचा दखल होण्यास दिकत केली व सन १२०२ सालचा यैवज आमानत ठेविला आहे. खान मजकूर यांस देत नाहींत. त्यास याचे बंदोबस्ताविसीं गोविंदराव भगवंत यास पत्र द्यावें ह्मणोन मध्यस्तांनीं व राजश्री रायेरामा बहादूर यांणीं सांगितलें. त्याजवरून हें पत्र लिहिलें असे कीं येविसीं राजश्री नानास विनंती करून देहाये मजकूरचा अमल दखल बंदगान अलीचे सनदे प्रमाणें करून देवावा. कदाचित माहाराव व मोरो हार दिकत करतील तरी त्यासही सरकारांतून ताकीद करवावी. रा छ, २९ जिल्काद बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.
माहे जिल्हेज उर्फ आषाढमास. ड-५

छ.६ रोजीं सखाराम अनंत नि।। सरा। मुख्यांनीं मागितलें सबब.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries