मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ इहिदे खमसैन मया व अल्लफ, सन ११६० फसली,
अव्वल साल छ २९ जमादिलाखर, २५ मे १७५०,
ज्येष्ठ शुध्द १ शके १६७२.

ताराबाई सत्तर वर्षांची ह्मातारी झाली असतां आपण स्वतंत्रपणे धनीपणा करावा ह्या खटपटींत सचिव यास अनुकूल करून घेऊन वरकांती सिंहगडास तिचा नवरा राजाराम याचें थडगें आहे तेथे दर्शनास जात असे. असें मिष करून साताऱ्याहून पुण्यानजीक शिवापुरास रामराजासुध्दां आली. रज्जब महिन्यांत (जून १७५०) आली. पंतसचिव ताराबाईस अनुकूल झाले. ही खबर ताराबाईकडे येण्याचे अगोदर दोन तीन महिने पेशवे यांस कळताच सचिव पंत यांच्या तुंग, तिकोना वगैरे किल्ल्यांची व मुलुखाची जप्ती करून चिमणाजी नारायण पंतसचिव व मुलगा चिटकोपंत असे पुण्यास आणून कैदेंत सिधा सरंजाम खासगीकडून पावत होता. छ २० रज्जव (१४ जून १७५०) अव्वलसाल श्रीमंतांची स्वारी मल्हारजी होळकर यांजकडे श्रीगोंद्यास गेली होती. छ २५ माहे मजकुरी (१९ जून १७५०) परत आली. पुण्यानजीक सिंहगड किल्ला पंतसचिवाचा आहे, तो आपल्यास मिळावा असें महाराज यांस श्रीमंतानें विचारलें. नंतर किल्ला दिल्याविषयीं आज्ञापत्रें झाली; परंतु किल्ल्यावर पंतसचिवाचे लोक होते, ते किल्ला खाली करून देईनात. लढूं लागले. तेव्हां किल्ला आपल्यास घेणें अवश्य, सबब त्याचे मोबदला पेटा सिरवळ परगणें खालसा अम्मल व परगणे जाफराबाद येथील बाबती अम्मल आणखीं कांही महाल वगैरे देण्याचें ठरवून जिवाजी गणेश खासगीवाले यास किल्ला घेण्यास पेशवे यांनी पाठविलें. त्यांनी किल्ला सर करून छ १२ साबान रोजी (६ जुलै १७५०) निशाण चढविलें. किल्ला व किल्ल्याखालील कर्यात मावळ वगैरे गांव सरकारांत घेतले. त्याची कमावीस जिवाजी गणेश याजकडेस पेशवे यांनी सांगितली होती. साबान महिन्यांत (जुलै १७५०) शिंदे होळकर यांस हिंदुस्थानांत पाठविलें. छ १७ रमजान (९ आगस्ट १७५०) रघोजी भोसले साता-यास श्रीमंतांनी ठेवून आपण सालगु॥ पुण्यास आले होते. आज्ञेप्रमाणें भोसले या तारिखेस श्रीमंतांकडे आले. छ १७ सवाल महिन्यांत (८ सप्टंबर १७५०) निरोप ठिकाणी जाण्याविषयीं होऊन वस्त्रें झाली. वऱ्हाड व गोंडवण आणि बंगाल यांच्या सनदा व शिवाय वऱ्हाडनजीक प्रतिनिधीकडील कांही मुलूख होता तोही त्यास दिला. छ १९ रमजान (११ आगष्ट १७५०) हडसर किल्ला जुनरानजीक आहे तो सर झाल्याची खबर आली. खासा स्वारी महादजी अंबाजीसुध्दा श्रावणमासी (आगष्ट १७५०) डे-यास च-होलीस तळावर गेली होती. तेथे भाऊसाहेबांनी रामचंद्र मल्हार यास भेटविले. रामचंद्रबाबाचे संकेतानुरूप श्रीमंतांशी भाऊसाहेब यानी बोलणें लाविलें की, कारभार आह्मी करूं. तेव्हां तें बोलणें श्रीमंतांनीं मान्य केले नाहीं. कारण पुरंदरे हल्ली कारभार करितात त्याचे उपकार आपल्यावर बहुत झाले आहेत, ह्मणून तें बोलणें मान्य केलें नाहीं. आपल्यास कारभार मिळत नाहीं असे भाऊसाहेब समजले. इतक्यांत कोल्हापूरकर संभाजी महाराज यांसकडून भाऊसाहेब यांस आज्ञापत्र झालें की शाहूचे राज्यांत पेशवे आहेत, आह्मांस पेशवे माहीत, आह्मी आपले राज्याची पेशवाई तुह्मांस देतो. त्या पत्रांतच तीन किल्ले ह्मणजे भीमगड व पारगड व वल्लभगड व पांच हजारांचा मुलूख देऊं असें लिहिले होतें.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries