मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

पंत प्रतिनिधी यांनी दरमहाचा ऐवज व सचिव यांनी पीलखान्याचा ऐवज व भोसले सेनासाहेब सुभा यांजकडून व मानाजी व तुळाजी आंग्रे यांजकडील व मंत्री व केसरकर यांजकडील सरदेशमुखीबद्दल व कुसाजी भोसले शिरोळ वगैरेबद्दल ऐवज व शहर सातारा वगैरे पेठ मंगळवारसुध्दां मक्त्याचा ऐवज, प्रांत वाई व प्रांत कऱ्हाड, हुजूर मामला व जावली व प्रतापगड निसवत महादाजीपंत पिंगळे यांजकडील प्रांत, मिरज निसबत शिवाजी डुबल फत्तेसिंग बावाकडील व कजबे रहिमतपूर व संस्थान सोंधे व सुभा व्याघ्रगड व वासोटा निसबत रत्नाकर विठ्ठल व महाल विठोबा वाकडे, व पो इंदापूर नागोराव मेघ:शाम, व कार्यात तासगांव निसबत खंडो नागनाथ व किल्ले संतगड व पांडवगड, संस्थान लखमेश्वर, व गदग येथील खंडणी व प्रांत गुजराथ प्रो हुजूरचे महाल १ भडोच, १ देहेजबरें खंबायत, १ अंकलेश्वर, १ नवसरी, १ घोगराज पिंपळ, १ मांडवी शहर, घोडेबंदर येथील ऐवज, याशिवाय खंडणी, कामरज प्रांत द्वारका, काठणहळी इनवा सरकार सोरट व कच्छभूज व किरकोळ बागा सरै वगैरे येत तो ऐवज सालाबाद येत असावा. असा बंदोबस्त आश्विनमासीं एकंदर केला. राणोजी शिंदा मयत झाला होता, त्याचा अधिकार वडील पुत्रास दिला. माळव्याची एकंदर जमा दीड कोट, पैकी होळकर यास ७४,००,००० लक्ष, व शिंद्यास ६५, ५०,००० साडेपासष्ट लक्ष, व बाकी साडे दहा लक्ष इतर सरदारांस वाटून दिले. त्यांत मुख्य आनंदराव पवार. रामराजे सदाशिवराव भाऊसाहेब यांजबरोबर सांगोल्यास होते. तेव्हां पेशवे यास सनद दिली होती की, साताऱ्यानजीक कांही मुलूख देऊन बाकी सर्व राज्यकारभार पेशवे यांनीं चालवावा. याप्रमाणें सनद झाली. परंतु याप्रमाणें मुलूख कांही न देतां रोख पैसाच देत आले. याप्रमाणें बंदोबस्त राजाचे नांवें झाला; परंतु लोकांत प्रसिध्दी पेशवे यांनी केल्याची झाली. याप्रमाणें एकंदर बंदोबस्त करून कार्तिकमासी (नोव्हेंबर १७५०) भाऊसाहेब महाराजांसुध्दां पुण्यास आले. मग ताराबाई यांचा व रामराजे यांचा आदर करून बंदोबस्तास बरोबर त्र्यंबकराव सदाशिव ऊर्फ नाना पुरंदरे यास फौजेनिशी देऊन साता-यास रवानगी केली. त्यासमयीं ताराबाईचे प्रसन्नतेकरितां सातारा  किल्ल्यावर पेशवे यांनी आपले लोक ठेविले होते, ते परत आणून, पूर्वीचे गडकरी वगैरे अधिकारी होते, त्यांस गडावर पाठवून, ताराबाईचे आज्ञेंत वागत जाण्याविषयी पेशवे यांनी आज्ञा दिली. यावेळेस रामराजे यांस पासष्ट लक्ष रुपये खर्चास देऊन समारंभाने साताऱ्यास ठेविले होतें. सांगोल्याचे स्वारीहून भाऊसाहेब परत आल्यावर बाबा ह्मणजे महादाजी अंबाजी पुरंदरे याचे मनांत भाऊसाहेब यांनी संभाजीकडील मनसब करून तेथील आधिपत्य मिळवावें असें होते. सांगोलें वगैरे ठाणी, गोपाळ महादेव, प्रतिनिधि भवानराव यास कारभारी नेमून दिला, याचे हवाली करावीं असें होतें; परंतु भाऊसाहेबांनी मान्य केलें नाहीं. मोहिमेस पैसा रामचंद्रबावा देईनात. मग नाना व भाऊ एक होऊन च-होलीस भेटले. बाबाची मसलत वाईट यामुळे पुढें बाबाशी विटले. बाबा पुण्यास आल्यावर चोरचौकी बसली. बाबाचें कृत्य नानास कळलें. पुरंदरास पाठविलें. फार संशय वाटून मनस्वी विटलें. पुढे नानाबरोबर बाबा उगीच सिंहस्थसाली हिंडत होते. नंतर स्वारीस निराळे पाठविले; परंतु विश्वास मध्यमच होता. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries