मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दुसरा ( १७१४-१७६१)

सु॥ खमस खमसैन मया व अलफ, सन ११६४ फसली,
अवल साल छ १३ साबान, ५ जून १७५४,
ज्येष्ठ शुध्द १५ शके १६७६.

छ २६ रमजान (१८ जुलै १७५४) भाऊसाहेब नाशकास जाऊन परत आले. भाद्रपद शुध्द २ (२० आगष्ट), मुक्काम किनई, जगजीवन परशराम ऊर्फ दादोबा प्रतिनिधि यांचा काळ जाला. भवानराव यांस प्रतिनिधिपद जालें. ते कृष्णाजी परशराम यांचे नातू. यांसच श्रीनिवास गंगाधर ह्मणत असत. छ ७ मोहरम, कार्तिक शुध्द ९ गुरुवार (२४ अक्टोबर १७५४). नानासाहेब व भाऊसाहेब कर्नाटकचे स्वारीस जाण्याकरितां गारपिरावर डेरे दिले होते तेथें दाखल जाले. त्यांजबराबर महादाजी अंबाजी पुरंधरेही गेले होते. छ १३ रबिलाखर (२६ जानेवारी १७५५) कर्नाटकचे स्वारीहून महादाजी अंबाजी यांची स्वारी वेगळी झाली. छ २७ रबिलाखरीं (३० जानेवारी १७५५) लढाई करून, ठाणें सर करून, बिदनुरापर्यंत खंडणी घेऊन परत आले. श्रीमंतांची स्वारी कर्नाटकांत जाऊन खाली लिहिल्या महालांची वांटणी बसविली. छ २६ रबिलाखर (६ फेब्रुवारी १७५५) विठ्ठल विश्राम यांजकडून बागेवाडी सरकारांत आल्याची खबर आली. छ ४ जमादिलाखर (१७ एप्रिल १७५५) एकेरींचें ठाणें सर जाल्याची खबर आली. छ २१ जमादिलाखर (५ मार्च १७५५) रोजीं ठाणें सर जालें. छ २९ जमादिलाखरीं (१२ एप्रिल १७५५) कर्नाटकचे स्वारीहून श्रीमंत पुण्यास परत आले. पेशवे कर्नाटकांतून परत आल्यावर आंग्रे यांचा मुलूख घेण्याविषयी इंग्रजांशी कुमक मागितली. पुढें पेशवे आपली फौज घेऊन तयार जाला. संभाजी आंग्रे मयत झाल्यावर त्याचा सावत्र भाऊ तुळाजी आंग्रे बाणकोटापासून सावंतवाडीचे दरम्यानचे मुलखाची वहिवाट करीत होता. सरकारांत नेमणुकीप्रमाणें ऐवज न देतां, उद्दामपणा करून समुद्रांतही इतर लोकांस उपद्रव देत होता. त्याचे बंदोबस्ताकरितां इंग्रजांची मदत मागितली, तेव्हां असे ठरलें कीं, पेशवे यांची लढाऊ गलबतें इंग्रजांनी घेऊन व इंग्रजांनीही तोफा वगैरे घेऊन आंग्रे यांजकडील समुद्रकिनारा किल्ले आहेत ते सरकारांत घ्यावे व बाणकोट इंग्रजांस द्यावें. परंतु पेशवे यांची गलबतें वक्तशीर न आल्यामुळें इंग्रजांकडील जेम्स नामे सरदार होता त्यानें ४ एप्रिल रोजीं सुवर्णदुर्ग किल्ला व त्यालगतचे खुष्की किल्ले त्या साहेबाच्या हाती लागले. पेशवे यांची गलबतें मागून येऊन दाखल जालीं. त्या जहाजावरील शिबंदीचा मुख्य नारोपंत ह्मणून होता. तो समुद्रांत युध्द करण्यास जात असे. पर्जन्यकाळातही पुढें नजीक यामुळें दुसरे किल्ले घ्यावयास वेळ राहिली नाहीं. सबब इंग्रजांनीं सुवर्णदुर्ग किल्ला रामाजी महादेवाचे स्वाधीन करून आपली जहाजें घेऊन माघारे मुंबईस गेले. तो सुवर्णदुर्ग किल्ला सर झाल्याविषयीं रामाजी महादेव यांजकडून पेशवे यांस छ १७ जमादिलाखर रोजी (३१ मार्च १७५५) फत्ते जाल्याविषयीं खबर कळली. त्या रामाजी महादेव यास मु॥ शिकेकटार सरकारांतून छ १७ रजबरोजीं (३० एप्रिल १७५५) दिल्ही. छ ६ रबिलावल पौष शु॥ ७ शनवार (२१ डिसेंबर १७५४) करवीरकर संभाजी महाराजांनी तुळाजी आंग्रे यांजकडून कार्यात मीठगावणें व प॥ सौदन व परगणा राजापूर व खारेपाटण दूर करून सरकारांत घेतले. त्यांची कमावीस खंडोजी माणकर यास सांगितली. छ १६ सफर मार्गशीर्ष वद्य २ रविवार (१ डिसेंबर १७५४) रवळा व जवळा हे किल्ले मोगलाकडून आले होते ते परत दिल्हे. तोफखाना नवा तयार करून माधवराव पानशी याजला सरदारी दिल्ही. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries