मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

शनवारीं त्रयोदशीस सारे कापडकरी मिळून साहेबाकडे गेले. तेव्हां त्याणें सांगितलें कीं तुम्हीं आपलीं माणसें शिपाई ठेवून आपला बंदोबस्त करावा, आम्हीही करीत आहों. तेव्हां कापडकरी व सावकार गुजराथी याणीं शिबंदी ठेवीत ठेवीत चालले. ते दिवशीं रास्ते यांचें वाडयांत येथें दास्तर साहेब होता तो गेला आणि सांगितले आह्मास रहावयास वाडा द्यावा. तेव्हां तेथें कारकून होते त्याणीं सांगितलें कीं आमचे धन्याचा हुकूम आह्मास नाहीं; तुम्ही पाहिजे तरी जबरदस्तीनें येऊन रहा; नाहीं तरी बाहेर कोठी आहे तेथें जें ठेवणें तें ठेवावें असें सांगितलें. तो बरें म्हणून उठून गेला. पुणेंयांत वर्तमान लोकांनीं उठविलें कीं पाट साहेब मेला. कोणी ह्मणत कीं लढाई समाप्त झाल्यावर अल्पिष्टीन साहेब याजकडे आला आणि ह्मणूं लागला कीं मला कारभार शहराचा सांगावा. तेव्हां अल्पिष्टीन याणें उत्तर केलें कीं तू निमकहराम आहेस; तूं आमचे जाती वेगळा रहा, आणि तरवारही धरूं नको, जे दिवशीं कुंपणी तरवार देईल ते दिवशीं धरावी. त्याचें पलटण आपलेकडे लावून घेऊन त्याचा दरमहा रु॥. ६००० होता तो बाद करून अडीच देऊं लागला कीं तूं निमकहरामी केली, परंतु कुंपणीचे उपयोगी पडलास, सबब हा दरमहा तुला आम्ही देतों, तू शहरांत पाऊल घालूं नये. अशी बातमी (लोक बोलत). अल्पिष्टीन साहेब गारपिरावर राहून शहरचा कारभार करी. X X X X X आहेच आहे. हें वर्तमान जाहालें. न्यायपंचाईत थोरले वाडयांत नित्य होत आहेत. सारा कारभार एक ठिकाणीं करीत आहे. ते दिवशीं रात्रीं रामोशी अ॥ ५०० येऊन गारपिरास सारा फिरंगी येऊन उतरला आहे. त्याजवर नित्य दगड टाकीत आहेत. रात्रभर आपले गोटांत तयार असतो. ते रात्रीं आपण येथें जो कारभार करतो तो साहेब गस्तीस निघाला होता. सारी गस्त करून उजाडतां आला. तों भांबवडें येथें त्याचें घर होतें तें रामोशी याणीं लुटलें. अशी वदंता ऐकतों. शहर पन्ह्याला बंदी, पहारा, गस्त, उतारीसुध्दा फिरत आहे. असें वर्तमान अमावास्येपरियंत जाहालें. आतां स्वारीतील वदंता नित्यानिशी नव्या येतात. त्या जितक्या सुचतील तितक्या लिहितों. कार्तिक वद्य ३ तृतीयेस अशी वदंता आली कीं स्वारींत दहा पांच नजरबंद केले. चतुर्थीस अशी वदंता आली की खासा स्वारी वीरवाल्ह्याकडून कोणीकडे गेली नकळे, पंचमीस वदंता आली कीं सारी फौज एके ठिकाणीं जमा पाडळीस जाहली आहे. स्वार पायदळ यांचा शेरा मनस्वी चढला आहे. फौज वगैरे ठेवीत आहेत. काटकी कर्नाटकांतून आले. रामदुर्गकर यांजकडीलही काटक आले. निपाणीकर कोरेगांवचे मुक्कामी भेटला. जे स्वारींत नजरबंद केले अशी वदंता उठली होती ती कांहीं नाहीं. सारे खुशाल आहेत. दम फौजेचा भारी आहे. षष्ठीचे दिवशीं वदंता आली कीं इंग्रज सालप्याचे घाटाअलीकडे तांबेगांव आहे तेथे राहिला. तेथें श्रीमंताकडील फौज येऊन लढाई मोठी जाहाली. घोरपडे वगैरे धरून नेले. सप्तमीस वदंता आली कीं तें कांहीं नाहीं, इंग्रज घाट चढून पुढें गेला, पेशवे यांजकडील फौजा मागे हटल्या, तो जोरानें चालिला आहे, पुढें कसें होतें ते बघावें. नवमीस वदंता आली कीं श्रीमंत एकादशीस माहुलीस जाणार. दशमीस लोक लढाईचें वर्तमान बोलत, दुसरें कांहीं नाहीं. एकादशीस ऐशी वदंता आली कीं फिरंगी याणें बोलावणें घातलें आहे. (ऐसें लोक) बोलूं लागले. पुणेयांतील फिरंगी बहाद्दर याणीं (पन्नास) शंभर लोक बंदोबस्तास पाठविले. द्वादशीस फिरंगी घाट चढून पुढें गेला. मागें कांहीं बुणगें मराठी फौजेतील लुटले, असेंही बोलूं लागले. त्रयोदशीस वदंता आली कीं श्रीमंत पाडळीहून निघून पुढें गेले. माहुलीस एकादशीस जाऊन द्वादशीचे दिवशीं तेथें तुळशीचें लग्न करून निघाले ते आपले लष्करांत आले, आणि कुच करून गेले. असेंही लोक बोलूं लागले. कोणी ह्मणत जोर फिरंगी याचा भारी, कोणी ह्मणत कीं जोर मराठी फौजेचा भारी, तथ्य आंत एकही नाहीं. असें वर्तमान नित्य नवें येतें तो लोक भारी हवालदील होतात. परंतु उपाय नाहीं. आणीक वदंता उठविली कीं साऱ्या मराठी फौजेचा तळ पाडळीहून निघोन नाहावीचा घाट चढून पुढें सावळीस गेला. फिरंगी बहादूर ते तळावर जाऊन उतरला. स्वारी पंढरपूरचे रोखानें गेली. कोणी ऐसें ह्मणतात कीं एकादशीस श्रीस पोचले. असेंही बोलूं लागले. कोणी असें बोलतात कीं दशमीस इंग्रज न्हावीचा घाट चढूं लागले तो तेथें लढाई मातबार जाहाली. तिची वदंता बोलूं लागलें कीं गोखले याणीं फौजेचा छाट करून सडे जरारे होऊन निघाले तों घाटांत येऊन गाठिलें. आणि घाटापासून वोहोळ कोश अर्धा होता तेथें पांच सात हजार पायदळ बसवून ठेविलें आणि आपण येऊन पलटणावर पडलें. इंग्रजांकडील पठाण आ दोनशे जिवें मारिलें आणि गोरे तुरुकस्वार आ ++++ थे, असा कटा जाहाला कीं पठाण पळाले. तीन आ माघारे आले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries