मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

तो तुरूकस्वार उठले तों याणीं काढावा काढिला. हे मागे ते पुढें असें करितां जेथें तें पायदळ बसविलें होतें तों पर्यंत काढावा काढीत गेले. तेथून पुढें गेले तो पायदळ याची फेर झडली आणि पुढून ते उलटले. ऐशी खराबी इंग्रजाची भारी जाहाली. पाचशे घोडे त्याणीं नेले आणि कांहीं बैलहि नेले. व दीडशे दोनशे गोरे मेले व पठाण हि गारद जाहाले. इंग्रज निघोन घाटापलीकडे आउंदचा यमाईचे डोंगरावर चढले. हे भवताले सारे उतरले आहेत. ऐसें हि बोलतात. कोणी म्हणतें कीं चार अ॥ मोठे जखमी जाहाले आहेत. असें हि बोलतात. कोणी बोलतात कीं श्रीमंत पंतप्रतिनिधीयांचे लष्करांत इंग्रज चाकरीस म्हणून गेले आणि गर्दी केली. असेंहि बोलतात. आणि एक बातमी आली कीं सुवर्णदुर्गचा किल्ला फिरंगी याणें दशमीचे दिवशीं घेतला. असें हि बोलत. कोणी म्हणतें कीं अंजनवेल घेतली. असें हि बोलतात. असें वर्तमान मार्गशीर्ष शु॥ प्रतिपदा मंगळवार परियंत जाहाले. शु॥ २ बुधवारीं वर्तमान उठलें कीं स्वारी श्री पंढरीहून फिरोन अकळोजेचें मुक्कामास आली. स्वारी अलीकडे पंधरा कोश बापू गोखले आहेत. त्या अलीकडे बारा कोश फिरंगी बहादूर आहेत. त्या अलीकडे तीन कोश सरकारची फौज, अबा पुरंधरे व नारो विष्णू, विंचुळकर वगैरे सुमारी १५००० आहेत. फिरंग्याकडून बाळाजीपंत नातू बलावयास बापू गोखले याजकडे गेले कीं तुमचा आमचा तह असावा, पुढें आह्मी तुम्हापाशीं कांहीं बोलत नाहीं, जो मुलूख दिला तितका पुरे, आम्ही शिरस्ते प्रमाणें एक पलटण घेऊन बेटावर असूं. तुम्ही आपला जो कारभार करणें तो करावा. तेव्हां गोखले याणीं उत्तर दिलें की X X X राज्य तुम्हास दिल्हें, आतां तह कसला ? ईश्वरें दिल्हें तरी आम्ही घेऊं, नाहीं तरी तुम्हास दिल्हेंच आहे, तुम्हीं करीतच आहा. बरें, असें ह्मणून नातू आपले लष्करांत आले. गोखले याणीं मनसबा असा केला आहे जें होणें तें हो, परंतु एकदा तोफांची मारगिरी करून शिताफी संग्राम करावा. तोफा सुमारी २० जमा केल्या आहेत. कांहीं किल्यावरून उतरल्या, कांहीं निपाणकर यांच्या, कांहीं बरोबरच्या, अशा मिळून वीस जमा केल्या आहेत. ऐशी वदंता बुधवारी सायंकाळ परियंत जाहाली. आणि एक वर्तमान कीं गारपिरावरील साहेब याणें रसद रु॥ ५००००० व कांहीं कणकेचे पाव, छकडे, सुमारी १२।१३, भरून गेले. बरोबर पलटणी लोक सुमारी ४०० व स्वारी सुमारी १०० असे गेले. मातक्यान् लोक बोलूं लागले कीं दिव्याचे घाटातून माघारे आले. कोणी ह्मणत पुढें गेले. असें बुधवारची प्रहर रात्र जाहाली. शिरस्तेप्रमाणें तोफा सुमारी ६ जाहाल्या, पांच चांदरात्र पैकीं व रोजची एक, एकूण सहा जाहाल्या. रात्र गेली. शु॥ ३ गुरुवारचें वर्तमान असें शहरांत आलें कीं श्रीमंतांची स्वारी पंढरपूराहून निघोन भीमा उतरली आणि दोन मजला पलीकडे गेली. कोणी म्हणतें करकमभोशास गेली. कोणी म्हणत टेंभुर्णीस गेले. कोणी म्हणत नरसिंहपुरास गेले. कोणी म्हणत परंडयास गेले. हिंदुस्थानांत जाणार असेंहि लोक बोलतात. दुसरी खबर आणिली कीं सल्ला जाहाला. परंतु कसा हें कोणास ठाऊक नाहीं. हिंदुस्थानची बातमी उठली आहे कीं एक लढाई शिंदे व इंग्रज यांची जाहाली. शिंदे यांची फौज सुमारी ६०,००० व पलटण शिंगरूप व जान बत्तीस मिळून बत्तीस, शिवाय होळकर याची फौज आहे. इंग्रज याची पलटणें ३५ व दहा हजार तुरुकस्वार आहेत. पुढें शिंदे याणीं तह अठरा वर्षांचा करावा ह्मणून बोलणें फिरंगी लाट साहेब याशीं घातले. तेव्हां त्याचें बोलणें पडलें कीं कांहीं मुलूख आम्हास द्यावा. ते शिंदे याणीं चार किल्ले दिल्हे. ते वेळेस येथील पहिले लढाईचें पत्र जाऊन पोचलें. बरें, ह्मणून शिंदे पुढें इंग्रज याचे येथें मेजवानीस गेला. तेथें नी + + + + + + + मूळ संस्थान आहे तु * * * * * आहे. तेथें बोलण्यांत जाबसाल आले. पुढें पंधरा दिवशीं इंग्रज यास मेजवानीचा बेत केला. ते दिवशीं इंग्रज याजकडील पत्र जाऊन पोचलें कीं फिरंगी यानीं पुणें घेतलें आणि थोरले वाडयात निशाण लाविलें. फिरंगी याची डाक चालत नव्हती. सबब त्याचें वर्तमान गेलें नाहीं. यांचें आधीं गेलें. ते कागद दाबून ठेविले आणि त्यास मेजवानी केली. त्यावर बैठक जाहाली. तेथें शिंदे यांणीं विचारलें कीं आतां तुमचा आमचा तह कसला ? आमचें मूळ संस्थान तुम्ही घेतलें आणि निशाण वाडयावर लाविलें. आतां तुम्हास तटून टाकितों. नाहीं (तर) याचा जाबसाल बोला. तेव्हां त्यास कैद करून बेडया घातल्या आणि त्यास सांगतात कीं दक्षणेतून किती दिवसांत निघोन येता ?

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries