मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)

श्री.
आश्विन शु. १ रविवार शके १७९५.

विनंती विज्ञापना. दौला अह्मांसीं बोलले कीं “बाबुराव यांची रवानगी होत आहे. तुमचे समक्ष यांसीं बोलावयाचें. तेव्हां आम्हीं त्यांस पुशीलें कीं “बाबुराव यांस काये सांगोन.पाठवण्याचें मुकरर केलें हें समजावें"याजवर दौलांनीं बोलण्यास आरंभ केला कीं “ तफैंन सरकारचे जाबसाल वाजबी प्रा परस्परें फैसल्यांत यावें. आणि मदारुल मावला यांनीं व भी बे किलाफ असावें हे स्वाहेर्ष फार दिवसांपासोन चित्तांत. परंतु, तसा प्रकार घडून येतच नाहीं यास काये करावे ? हें सर्व दरेनें तुम्हांसीं हमेष बोलण्यांत आलें. त्याजवर पटणची मोहीम करून येतें समई हरी पंडतजी यांसी बोलण्यांत कोणतींहि बाकी राहिली नाहीं. त्यांचें ह्मणणें कीं पुणियास गेल्यानंतर याचें उत्तर पाठवितो. .... .... (यापुढें १५ पृष्ठें कसरीचे सपाटयांत सांपडलीं. पुष्ठांक १३१ ते १४५ सं. ) .... इष्टवटाकडे मांलिटानें पाठविला. तेंव्हां संशय कोणता? महिनाभर याद न येण्याचें कारण काय ? हें मसलतीचें काम. यास असी देरकषी होणें खुषर्नुमा दिसण्यांत येते कीं काये ? याचा विच्यार पाहावा. लाडबाहादुर यास विलायेतीहून पत्रें जलद येण्याची व निकड कशी ? तथापि, टिपुचे मसलहत प्रकर्णी काम आपले विद्यमानचे. याची पुढिल ही दुरुस्ती आपले हातें हमेपणें व्हावी; यांत तीन सस्कारास ही उपयोग व चांगलें. यैसें समजोन आज पर्येंत लाडास त्याचे खाविंदांचा हुकुम जलद येण्याचाही असतां, या कामा करितां राहून, दोंहीं सरकारांत वकील आहेत त्यांस पैहाम लिहितात कीं साता दफेचा करार होऊन लौकर पोंहचाव्या. यैसें असतां साता दफेस सात महिने गुजरुन गेले.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries